जनतेचा आवाज म्हणून शाहू महाराज यांना विजयी करा  संयोगीताराजे 

Spread the news

  1. जनतेचा आवाज म्हणून शाहू महाराज यांना विजयी करा

संयोगीताराजे

कोल्हापूर ः प्रतिनिधी
कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी आणि  जनतेचा आवाज म्हणून शाहू महाराज यांना कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्यांनी विजय करा, असे आवाहन संयोगीताराजे छत्रपती यांनी केले.

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचार सभेत बुधवारी त्या कोपार्डे (ता. करवीर ) येथे बोलत होत्या.
संयोगिताराजे म्हणाल्या, शाहू महाराज हे समतावादी विचार घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाची माहिती असून ते प्रश्न शाहू महाराज अभ्यासपूर्वक सोडवतील. क्रीडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राचा त्यांना प्रगल्ब अभ्यास आहे. जनमाणसात ते राजे म्हणून नाही, तर जनतेचा पाईक म्हणून वावरतात. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ऊस दर आंदोलनाला शाहू महाराजांनी पाठिंबा देऊन, त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या सोबत खर्डा भाकरी खाल्ली. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असणारे शाहू महाराज आहेत. कोल्हापूरचा आवाज दिल्ली जाण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.

त्यांच्या समवेत तेजस्विनी राहूल पाटील – सडोलीकर प्रमुख उपस्थित होत्या.
तेजस्विनी पाटील म्हणाल्या, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शाहू महाराज हेच योग्य उमेदवार आहे. त्यांना पाठबळ देणे ही आपली जबाबदारी आहे. दिवसभर  शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेवाडी, बालिंगा, दोनवडे, साबळेवाडी, खुपिरे, कुडित्रे, आडूर, कळंबे, भामटे चिंचवडे आदीं गावांचा दौरा करून संयोगिताराजे यांनी मतदारांशी संवाद  साधला. महिला, तरूणांसह विविध संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
—————-
दौऱ्यात सर्वपक्षीयांचा सहभाग
संयोगीताराजे यांच्या दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून तरूणांसह महिला मोठ्या संख्येने दौऱ्यात सहभागी होऊन हितगूज साधत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दौऱ्यात सर्वपक्षीयांचा मोठा सहभाग पहायला मिळत आहे. जागोजागी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागतही केले जात आहे.
——

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!