- *डीवायपी पॉली ग्रीन ब्रिगेड” यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित* *कार्यक्रमात आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी आर्मड फोर्सेस ऑफिसर्स आणि माजी सैनिकांशी संवाद
कोल्हापूर
डीवायपी पॉली ग्रीन ब्रिगेड” यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित* *कार्यक्रमात आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी आर्मड फोर्सेस ऑफिसर्स आणि माजी सैनिकांशी संवाद साधला .यावेळी या सर्वांचा सत्कारही करण्यात आला*
आपण सर्वांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने कार्यरत राहू, असे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी सैनिकांनी देशसेवेत असतानाचे आपले रोमांचक अनुभव सांगितले.
रवींद्र पंडित यांनी देशभक्तीपर गीत सादर करून चैतन्य निर्माण केले.
यावेळी कर्नल विलास सुळकुडे, मुरलीधर देसाई सर,हवालदार संजय माने,हवालदार विजय पाटील, हवालदार बसगोंडा पाटील,हवालदार नारायण पाटील, सुभेदार संजय खोत,सुभेदार अशोक माळी,मारुती पाटील,रविकुमार चव्हाण यांच्यासह माजी सैनिक तसेच डी .डी.पाटील उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय कुलकर्णी, समीक्षा पारखे, समृद्धी मेटील,वैष्णवी पार्टे यांच्यासह ग्रीन ब्रिगेडच्या विद्यार्थ्यांनी नियोजन केले.