Spread the news

 

कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची अवस्था धोबी का कुत्ता घर का ना घाट का

शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांची टीका

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची अवस्था धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी झाली आहे असे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी प्रसिद्ध दिले आहे.

 

मोदी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सत्तेचे आमिष दाखवून जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी व अन्य पक्षाच लोकांना पक्षात घेतले व कट्टर व मूळ भाजपच्या लोकांना घरी बसवले. आज है बाहेरून आलेले नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत . कारण ज्या उद्देशाने त्यां पक्षात आले होते तो उद्देश त्यांचा सफल होत नाही हे लक्षात आल्यावर ते अन पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. व जात आहेत .ज्या मंत्री महोदय चंद्रकांत दा पाटलांना कोल्हापूर चे म्हणून ओळखले जाते त्यांना खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल् कधीच कळलच नाही हे भारतीय जनता पार्टीचे दुर्दैव आहे.

 

भाजपला आता निष्ठावंत कार्यकर्त्यांची आठवण होत असून  म्हणूनच नाथा पाटील सारख्या कार्यकर्त्या जिल्हाध्यक्ष केले जाते स्वतःचा स्वार्थ साधणारे अनेक जण काही दिवसात भाज सोडून गेले तर आश्चर्य वाटायला नको असेही या पत्रकात म्हटले आहे.

 

शिवसेना उद्‌धव बाळासाहेब ठाकरे पक्ष


Spread the news

You may also like

error: Content is protected !!