कोल्हापूरच्या विकासासाठी शाहू महाराजांची हात बळकट करा मालोजीराजे यांचे आवाहन

Spread the news

कोल्हापूरच्या विकासासाठी शाहू महाराजांची हात बळकट करा

मालोजीराजे यांचे आवाहन

कोल्हापूर

पाच वर्षात विद्यमान खासदार भुदरगड तालुक्यातील कोणत्याही गावात गेले नाहीत, वाड्यावर पोहोचले नाहीत, फारसा निधी दिला नाही, त्यामुळे यंदा त्यांच्याबद्दल नाराजी असल्याने परिवर्तन अटळ आहे असे स्पष्ट करतानाच श्रीमंत शाहू महाराज यांचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन माजी आमदार मालोजीराजे यांनी यांनी व्यक्त केले.

भुदरगड तालुक्यातील नाधवडे, मडिलगे, पाटगाव, वाघापूर, आदमापूर, गंगापूर, मिणचे खुर्द, खानापूर, टिकवडे, म्हसवे, अकुर्डे, कडलगे, शिवडाव, सोनुर्ले, सोनारवाडी, कलनाकवाडी, कोंडूशी, गारगोटी इतर अनेक गावात त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. काही ठिकाणी छोट्या सभा झाल्या. या सभेत बोलताना
मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचा नवा चेहरा द्यायचा आहे. पाच वर्षात निष्क्रिय खासदारामुळे विकास झाला नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना विजयी करून विकासाची वाट मोकळी करायची आहे. जनता महाराजांच्या पाठीशी आहे. यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.

यावेळी शामराव नाना पाटील, संजय
सरदेसाई, अरुणराजे भोसले, बाळासाहेब गुरव यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी सरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!